Paryavaran MaRaathi माहिती पर्यावरण मराठी माहिती

पर्यावरण मराठी माहिती



GkExams on 21-11-2018

पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल तर तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून का समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रति नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही. हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. त्यामुळे आज ‘पर्यावरण वाचवा’ यासारखे वाक्ये कानी पडत आहेत.


सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो त्यामुळेच त्या कुंटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे. असे वाटत नाही काय? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुटुंब नियोजनसारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. लोकसंख्येला आळा घातल्याशिवाय आपली कोणतीही प्रगती शक्य नाही व आपला देश महासत्ता होणार नाही.


आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो, मात्र हवतील ऑक्सिजनशिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि हवेतील कार्बनडायऑक्साईड म्हणजे खराब हवा कायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संकर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. जंगल वाचविण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ‘चिपको आंदोलन’ चालविले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. वृक्षांचे महत्त्व अपरंपार आहे, हे आपले पूर्वजसुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ‘वृक्षकल्ली, आम्हां सोयरे, वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.’’ खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे का? वृक्षांच्या महत्त्वाविषयी आपले पूर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. येथील एकतृतीयांश जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अधिक उत्पन्न काढण्याच्या स्वार्थासाठी शेतकऱयांनी आपल्या शेतीची जुनी पद्धत बंद केली असून, रासायनिक औषध व खताचा बेसुमार वापर करीत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा कस तर नष्ट होतच आहे. शिवाय त्या रासायनिक घटकांचा प्रतिकूल परिणाम मानवाच्या आरोग्याकर होऊन हानी पोहोचत आहे. डीडीटी या कीटकनाशक औषधाचा अतिकापर केल्यामुळे कीटकनाशक मानवाच्या शरीरात कशी पोहोचली जातात आणि ते पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचे सत्य कॉर्सने 1962 मध्ये सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडले होते. उत्पादन कमी निघाले तरी चालेल; परंतु रासायनिक औषध व खताचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रिय खताचा वापर प्रत्येक शेतकऱयांनी करायला पाहिजे. सर्वच शेतकऱयांनी आपले संघटन तयार करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे ठरविले तरच सर्वांना त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्यावे.


नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर उर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अशा सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. आज ज्या सौर उैर्जेचा कापर नगण्य स्करूपात आहे, म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनांच्या मदतीने कापर करता येऊ शकतो आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकेल. सौर बंब, सौर चूल, आणि सौर उर्जेकर चालणाऱया विविध उपकरणांचा जास्तीत जास्त वापर कसे करू शकतील? याविषयी शासनाने महत्त्वाचे फायदेशीर निर्णय घेणे अपेक्षित आहे.






सम्बन्धित प्रश्न



Comments



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment