Mahatma Gandhi Vichar MaRaathi महात्मा गांधी विचार मराठी

महात्मा गांधी विचार मराठी



GkExams on 10-01-2019

महात्मा गांधीजींची हत्या होऊन आज 68 वर्षे झाली. या 68 वर्षात गांधींचा विचार मारता आला का? किंबहुना हा विचार मारता येणे शक्य आहे का? गांधी ही व्यक्ती होती की, विचार होता? व्यक्तीला मारून विचार मारता येतो का? गांधीजींचे महत्त्व संपवता येते का?


देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत स्वातंत्र्याचे एक वातावरण तयार केले. हातात शस्त्र न घेता शांततामय मार्गाने आपल्या स्वातंत्र्याची मागणी रस्त्यावर येऊन अत्यंत शांततामय मार्गाने करायची आणि सत्ताधा-यांनी लाठी मारली तर लाठी खायची, गोळी मारली तर गोळी झेलायची; पण, आपली मागणी ठामपणे मांडत राहायची. असे एक जगाच्या पाठीवरचे अद्भूत तत्त्वज्ञान महात्मा गांधींनी आपल्या कृतीतून या देशातल्या लोकांसमोर ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की, गांधीजींच्या या अहिंसक तत्त्वज्ञानाने सा-या देशात एक अिहसक पर्व तयार झाले. आत्मिक आवाजाचे सामर्थ्य किती मोठे आहे आणि ‘सत्य’ शब्दाला किती मोठी प्रतिष्ठा आहे, याचे दर्शन घडवणारा तो काळ होता. महात्माजींना न पाहिलेले, महात्माजींना न भेटलेले, महात्माजींचे भाषण न ऐकलेले असे या देशातील कोटय़वधी लोक ‘बापू सांगतात म्हणून’ सत्याचे प्रयोग करीत राहिले, अहिंसेचे प्रयोग करीत राहिले आणि स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, लाठी, गोळी खायला, रस्त्यावर उतरायला सिद्ध झाले. हे वातावरण महात्माजींच्या कर्तृत्व, चारित्र्यातून निर्माण झाले. ‘करेंगे या मरेंगे’ या दोन शब्दांमध्ये, क्रांतीचा वणवा पेटवण्याची शक्ती आहे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती होती. कोण बाबू गेनू? कुठे महात्मा गांधीजींना भेटला? महात्मा गांधी त्याच्या घरी कुठे गेले? पण गांधीजींच्या नेतृत्वाचा परिणाम स्वातंत्र्यासाठी लढणा-या तरुणांच्या मनावर इतका जबरदस्त झाला होता, की परदेशी कपडय़ाच्या गाडीपुढे या तरुणाने उडी घेतली. रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. बाबू गेनू अमर झाला. नंदूरबारचा शिरीषकुमार मेहता. एवढासा कोवळा जीव. पण गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या अहिंसक संदेशाने भारलेल्या त्या तरुणाने भारतीय स्वातंत्र्याच्या बलवेदीवर आपल्या जीवाचे फूल समर्पण केले. सगळा देश या भावनेने भारलेला होता. 1930 ते 1947 या 17 वर्षाच्या काळात महात्माजींनी देशाला नवी प्रेरणा दिली, नवी दृष्टी दिली आणि अवघ्या दोन शब्दांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची फार मोठी शक्तीही दिली. जगात कोणताही देश असा नाही जो फक्त दोन शब्दांनी स्वतंत्र झालेला आहे आणि ते शब्द आहेत, ‘चले जाव’, ‘छोडो भारत’, ‘जय हिंद’, ‘चलो दिल्ली’.. अशा दोन शब्दातून साधने नसताना अख्ख्या देशाला जागे करण्याची आणि गदगदा हलवण्याची ताकद गांधीजींच्या नेतृत्वात होती.


हा गांधीवाद हा केवळ स्वातंत्र्य मिळवण्यापुरता नव्हता. तो जीवन-मरणाची एक शैली आहे. खादीचा वापर, स्वावलंबन, श्रमाची प्रतिष्ठा, अद्ययावत खेडय़ांची निर्मिती आणि सार्वजनिक जीवनातील चारित्र्य ही गांधीवादाची सूत्री आहे. श्रमाशिवाय मिळवलेला पैसा झूठ आहे, हे सांगण्याचे धाडस फक्त गांधीवादात आहे. श्रमाची पूजा केली पाहिजे, हे सांगण्याचे धाडस गांधीवादात आहे. कोणतेही काम करायला लाज वाटता कामा नये, हेही गांधीवाद सांगतो. एक काळ असा होता जेव्हा स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी तत्त्वज्ञानाचा प्रभावही लोकांवर पडलेला होता. पंडित नेहरू त्या समाजवादी विचारांनी भारावलेले होते. समाजवादामध्ये गरिबीची वाटणी नसते. श्रीमंतीची वाटणी असते. गांधीवादामध्ये श्रमाची वाटणी आहे.


या देशातला गांधीवाद हा गेल्या काही दिवसांत पराभूत होताना दिसत आहे. गांधी जीवनाचे एक तत्त्वज्ञान आहे. परदेशातल्या अनेक देशांनी या गांधीवादाच्या तत्त्वज्ञानाने अचंबित होऊन गांधींना विश्वपुरुष मानले. त्या महात्माजींना आपल्या देशातील जनता मात्र?फार झपाटय़ाने विसरलेली दिसते आहे. गांधीजींना ज्याने मारले, त्या प्रवृत्तीचा गौरव होताना दिसतो आहे. त्या मारेक-याची स्मारके करण्याची चर्चा होते. त्यावर नाटके येतात आणि एका खलनायकाची प्रतिमा नायकामध्ये परावर्तीत करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न होतो. दुर्दैवाने आजचे सरकार हेसुद्धा गांधीवादी विचारांना संपवण्याच्या मागे आहेत. या सरकारला आणि या प्रवृत्तीला ही गोष्ट स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, असा प्रयत्न करणारे संपतील; पण गांधीवाद नावाचा विचार कधीही संपू शकणार नाही. गांधींना मारणारे मेले; पण गांधींजी विचारांच्या रूपाने जिवंत आहेत. गांधीजींनी देशाला जो महामंत्र?दिलेला आहे. त्या महामंत्रातून या देशाला मिळणारी त्स्फूर्ती आणि ऊर्जा ही देशाची शाश्वत ऊर्जा आहे.


महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या चळवळीत देशात सर्वाधिक सहभाग घेतलेला आहे. या देशातले अनेक क्रांतिकारक महाराष्ट्रातच झाले आहेत. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हेही महाराष्ट्राचे. या सर्व क्रांतिकारकांच्या त्यागाबद्दल, देशभक्तीबद्दल आणि त्यांनी देशासाठी ज्या खस्ता खाल्या त्याबद्दल कुणाचेही दुमत नाही; परंतु, क्रांतीवाद ही सलग टिकणारी गोष्ट नव्हे आणि तो विचार नव्हे, ती कृती आहे; पण, गांधीवाद हा विचार आहे. असत्याला सत्याने सामोरे जाण्याकरिता एक नैतिक अधिष्ठान लागते. ते नैतिक अधिष्ठान हा गांधी विचार आहे. या विचाराचे सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, अशा व्यक्तिमत्त्वांपुढे मग चंबळ खो-यातले आणि भिंड-मुरेना जिल्ह्यातले डाकूही आपल्या बंदुका ज्यांच्या पायाशी टाकतात, त्या विनोबांच्या गांधीवादाचे सामर्थ्य हे त्या बंदुकांच्या गोळीपेक्षा अधिक प्रभावी आहे. त्यामुळे गांधीवाद आणि गांधी विचार हा कधीही हतबल होणार नाही आणि कधीही पराभूत होणार नाही. नथुराम गोडसे नावाची नावनिशाणी जेव्हा जगात राहिलेली नाही तेव्हा गांधीवादाचा आणि गांधी विचारांचा जयजयकार झालेला आहे. विकृत प्रवृत्तीचे लोक भले गोडसेला नायक करायच्या मागे लागोत; पण, ‘नालायक’ कधी ‘नायक’ होऊ शकत नाही आणि म्हणून ज्यांनी गांधींना मारले, ते मेले आहेत; मात्र, गांधीवाद कायमचा जिवंत राहणार आहे.






सम्बन्धित प्रश्न



Comments



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment