वन्यजीवांचे संरक्षण काळाची गरज
जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फ़त प्रयत्न केले जाणार आहेत.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करुन, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश असणार आहे. व्याघ्र प्रकल्पात मानववस्ती नसलेल्या व मानवी वर्दळ नसलेल्या जंगल भागांचा विकास कोर क्षेत्र म्हणून केला जाणार आहे. त्या सभोवताली असलेल्या क्षेत्राला बफर म्हणून निश्चित केले जाणार आहे. जेणेकरुन तेथे राहणार्या लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून न राहता, त्यांना त्यांच्या गरजा त्यांच्या गावातच भागविणे शक्य होणार आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण करणे, त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करणे, कर्मचार्यांची क्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींचा समावेश यात राहणार आहे. सध्या मेळघाटात वाघांची संख्या ही साठच्या घरात आहे, असा अंदाज आहे. वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन 1972 पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे.
(लवकर बरे व्हा शांतता पाळा, स्वच्छता राखा
रोग्यांना भेटण्याची वेळ-सकाळी 10 ते 11,दुपारी4 ते 6
शक्यतितका मोबाईलचा वापर टाळा)
वरील घटक(फळांचा) तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
गुनगौरव समारंभ प्रसंगलेखन
Byyyy?
Very nice
Good
Vany jeevan vachva abhiyan
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity
Vanyajiv vachava abhiyan